मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीनामदेव चरित्र| अभंग १२१ ते १३० श्रीनामदेव चरित्र अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० अभंग १०१ ते ११० अभंग १११ ते १२० अभंग १२१ ते १३० अभंग १३१ ते १४० अभंग १४१ ते १५० श्रीनामदेव चरित्र - अभंग १२१ ते १३० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangbooknamdevअभंगनामदेवपुस्तक अभंग १२१ ते १३० Translation - भाषांतर १२१जरी म्हणसी देव देखिला । तरी हा बोल भला नव्हे नाम्या ॥१॥जोंवरी मी माझें न तुटे । तंव आत्माराम कैसेंनि भेटे ॥२॥खेचर साह्यानें मीं कांहीं नेणें । जीवा या जीव इतुलें मी जाणें ॥३॥१२२मेघेंविण जळ कीं जळेंविण पूर । नख न बुडे परी नाहीं उतार ॥१॥येथें आहे तो बुडे नाहीं तरे । लटिक्याचे खरें मानिसी काई ॥२॥म्हणे खेचर विसा तूं जालासी पिसा । दृश्याची हे आशा सांडी नाम्या ॥३॥१२३सुखाचें सुखरूप घेउनी जा तरी । विठ्ठल नामें भरी तिन्ही लोक ॥१॥आशापाश याही वासना पोखी । विठ्ठलनामा शेखीं घेऊनी राहे ॥२॥न लगती सायास करणें काया क्लेश । आपण वैकुंठ येईल सवें ॥३॥नाठवी संसार नाठवी देहभाव । रोहिणीची माव नकळे काय ॥४॥कुल्लाळकुसरीं भ्रमत चक्र । आयुष्या आवर्त मापा करीं ॥५॥खेचर विसा म्हणे येथुनी काढिलें । तें तुज दिधलें जा रे नाम्या ॥६॥१२४भवजलधि अगाध तरावया दुस्तर । रचिलें पंढरपूर चंद्रभागा ॥१॥तारूं पंढरिनाथ मोलेंविण उतरितु । उगला असे तिष्ठतु वाट पाहे ॥२॥बुडतयाचें भय नाहीं संसारीं । कलिमाजीं पंढरी नाव थोर ॥३॥राव रंक दोन्हीं बैसवुनी वरी । उतरी पैलतीरीं भरंवसेनी ॥४॥आठराही आवले जे नावेसि लागले । साही खण भरले मिरवताती ॥५॥चौमुखीं वर्णितां नकळे याचा पार । वेदां अगोचर सहस्त्रमुखा ॥५॥सडियातें कांसे लावित आपण । कुटुंबिये जाण नावेवारी ॥७॥प्रेमाचे पेटे बांधोनियां पोटीं । उतरी जगजेठी पैलपारु ॥८॥आप आंगें उघाडी बुडत्यातें कडे काढी । ऐसे लक्षकोडी तारियले ॥९॥सहस्त्र नाम पेटे बांधे मज मोटींज । तरी जगजेठी लावी कांसे ॥१०॥आदि करोनी सर्वही तारिले । उतरूनि तारिले पैलतिरीं ॥११॥ऐसे पक्षी कीट गुल्मल तारिले । खेचरा विसा म्हणे तारी मातें पुंडलिक ॥१२॥१२५श्रवणीं सांगितली मात मस्तकीं ठेवियेला हात । पदपिंडाविवर्जित केला नामा ॥१॥खेचरु विसा प्रेमाचा पिसा । तेणें नामा कैसा उपदेशिला ॥२॥तया सांगितलें गुज । आतां पाल्हाळीं तुज काय चाड ॥३॥मग खेचरू म्हणे मज ज्ञान हेंचि गुरु । तेणें ओगचरु म्हणे केला नामा ॥४॥१२६सुखालागें मन तुझें गिवसित तळमळी । परि सुख आहे जवळी नकळे तुज ॥१॥दर्पणीं दीप्ति कीं दुग्धीं घृतशक्ति । परि करणीविण हातीं न लभेची जाण ॥२॥सुखालागीं सुखसोय दाखवीत पाहे । अनुभवोनी होय सुखरूप ॥३॥सुख तें शांति सुख तें दया क्षमी । सुख तें उपदेश मी निर्विकारी ॥४॥सुख तें नैराश्य सुख हरिदास्य । सुख तें विश्वास सदा वसे ॥५॥सुख तें सत्संगतीं सुख तें नामीं प्रीति । सुख तें विकृति विषयभोगीं ॥६॥सुख तें एकांतवास सुख तें लौकिक त्रास । सुख तें सौरस स्वस्वरूपीं ॥७॥म्हणे खेचर विसा परियेसी विष्णुदासा । न घडे भरंवसा तरी अनुभवणें ॥८॥१२७भक्ति त्रिविधा षड्विध नवविधा । यजन याजनें जीवातें दंडिताती सदा ॥१॥केशव परमात्मा नेणोनि याजी पतितें । पतनीं पडतां होती भूतें रया ॥२॥नाहीं रूप स्थिति नाहीं शब्दस्थिति । नित्य तया वस्ती निरंजनीं ॥३॥एकलें परब्रह्म गुरुमुखें जावावें । तरि चुकवावें पुनरावृत्ति रया ॥४॥ऐसें रे नामया वचन ऐक पुढें । हे तो देवाविषयीं श्रुतीचे निवाडे ॥५॥श्रुती नेती परतोनि आलिया । खेचर पुढें सांगे नामया ॥६॥१२८आधीं चैतन्य अपैतें करोनी । मग संचरे तारुण्य वनीं ।कामक्रोध तुज देखोनी । जाती पळोनी बारा वाटा ॥१॥तुज पाठीं कवण धांवे । कवण टाकी कवण पावे ।कामक्रोधें जग मोहावें । कासयासी खोवावें पोटीं पाय ॥२॥माया मोहजाळ तुटेल । पळेल पां काळ व्याळ ।कां रे स्मरसी ना गोपाळ । मिथ्या ब्याकुळ कांजेविण ॥३॥बैराग्य दृढ होई निरुता । कासया भितोसी चपेटघाता ।परस्त्री तितुकी मानी माता । विषयीं निमित्या आल्यासाठीं ॥४॥धर्माचेनी मार्गें निघाला कर्ण । शिबी चक्रवर्ती जाला जीवित्वहीन ।तयामाजीं सांग नाडला कोण । लटकी झकवण कां बोलती ॥५॥इंद्रिया गोड तें आरोगिजे । मग धनीवरी धावा पोखरिजे ।काय सांगूं शहाणपण तुझें । खेचर विसा म्हणे अरे नामया ॥६॥ १२९पर्वतप्राय पापराशी होती दग्ध । वाचेसी मुकुंद उच्चारितां ॥१॥अच्युत श्रीहरी केशव नरहरी । माधव हरहरी रामकृष्ण ॥२॥नामाचें साधन करशील पूर्ण । तें प्रपंचाचें भान उरों नेदी ॥३॥उदासीन वृत्ति आचरावें कर्म । नाहीं देहधर्म गुण माया ॥४॥ऐसा हा अनकळित मार्ग साधेल तुज । खेचर विसा गुज सांगे नाम्या ॥५॥१३० आप तेज वायू पृथिवी गगन । मेलें तें कवण पंचामध्यें ॥१॥आम्हां मरण नाहीं मरशील काई । आत्मवस्तु पाही श्रीगुरुमुखें ॥२॥जिताची मरण आलेंसें हातां । मरण बोलतां लाज नये ॥३॥खेचर विसा म्हणे आम्हां मरण नाहीं । कैसें मरण पाही आलें नाम्या ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP