मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
अकरावे दिवसाची क्रिया

अकरावे दिवसाची क्रिया

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


अकराव्या दिवशी सकाळी उठून घर सावरावें व सूतकांत उपयोगांत घेतलेलीं मातीची भांडी टाकून द्यावीं. सर्व सपिंडांनी सचैल स्नान करून सूतकांतील वस्त्रें धुवावीं. स्नान केल्यावर पंचगव्य प्राशन करावें.
कर्त्यानें आचमन व प्राणायाम करून देशकालाचा उच्चार करावा. व सूतकांत झालेल्या माझ्या अशुचित्वादिक सर्व दोषांच्या परिहारासाठीं तसेच वृषोत्सर्गादि कृत्यें करण्यास अधिकार प्राप्त होण्यासाठीं मी पंचगव्य प्राशन करितो. ’ असें म्हणावें. मग पंचगव्य प्रणवमंत्रानें यथाविधि तयार करून प्रणवमंत्रानें तें प्राशन करावें.
धनिष्ठापंचक, त्रिपाद नक्षत्रें, त्रिपुष्कर इत्यादिक मरणसमयीं आली असल्यास, त्यांबद्दलची शांति सूतक संपल्याबरोबर प्रथम करावी. नंतर वृषोत्सर्गादि कर्में करावीं.


References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP