मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा १५१ ते २००| सिंह, अस्वल, माकड व कोल्हा कथा १५१ ते २०० लांडगा, कोल्हा व वानर लांडगा आणि घोडा लांडगा आणि बकरा कुत्रा आणि घंटा कोळी व मासा कोळी व रेशमाचा किडा कोल्हा व मुखवटा कोल्हा आणि लांडगा कोल्हा कावळा आणि सुरई हरिणी व तिचे पाडस हंस व बगळे घार व कबुतरे गरूड पक्षी व बाण चित्ता आणि कोल्हा स्वार आणि त्याचा घोडा खूप मित्र असलेला ससा कुत्रा व सुसर पारवा व कावळा वानर आणि कोल्हा घोडा आणि गाढव कोकीळ, पोपट व घार लांडगा आणि करडू मांजर व वटवाघूळ वानर आणि सुतार वाघ आणि चिचुंद्री सिंहाचे कातडे पांघरलेला गाढव आणि कोल्हा शिकारी कुत्रा आणि गावठी कुत्रा सापाचे शेपूट वेडावणारा पक्षी म्हातारा सिंह मेंढी व धनगर मत्सरी काजवा माणूस आणि दगड मांजर आणि चिमण्या माकड आणि मधमाशी कोल्हा आणि म्हातारी कोल्हा, लांडगा व घोडा करढोक आणि मासे हरिण आणि द्राक्षाचा वेल घुबडे, वटवाघुळे आणि सूर्य घार आणि शेतकरी दोन घोरपडी बोकड आणि काटेझाड बेडकी आणि तिचे पोर वानर आणि कोल्हा टोळ आणि मुंग्या सोन्याची अंडी देणारी हंसी सिंह, अस्वल, माकड व कोल्हा सिंहाची गुणज्ञता सिंह, अस्वल, माकड व कोल्हा इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral. Tags : aesop fablesbalkathaइसापनीतीतात्पर्य कथाबालकथा सिंह, अस्वल, माकड व कोल्हा Translation - भाषांतर एकदा अरण्याचा राजा सिंह याने आपल्या प्रजाजनांना दरबारात हजर राहण्याचा हुकूम सोडला. त्याप्रमाणे बहुतेक प्राणी सिंहाच्या दरबारी आले. अस्वलाला सिंहाच्या स्वयंपाक घरातून येणारा वास सहन न झाल्याने त्याने आपले नाक दाबून धरले. हा त्याचा उद्धटपणा पाहून सिंह रागावला व त्याने आपल्या पंजाच्या एका तडाख्यात अस्वलाला मारले. हा भयंकर प्रकार पाहून माकड भितीने थरथर कापू लागले. मग काहीतरी बोलायचे म्हणून ते सिंहास म्हणाले, 'राजेसरकारांच्या स्वयंपाक घरातून येणारा सुवास निरनिराळ्या उंची मसाल्याचा आहे. तो त्या मूर्ख अस्वलाला सहन झाला नाही. हे त्याचं दुर्दैव होय. राजे सरकारांचे पंजे तर फारच सुंदर आहेत, तसे इतर कोणाचेही नसतील.' माकडाचे हे बोलणे ऐकून सिंहाचे समाधान तर झाले नाहीच पण तो इतका चिडला की, एका क्षणात त्याने त्या माकडाच्या चिंधड्या उडविल्या. नंतर तो कोल्ह्याकडे वळून त्याला म्हणाला, 'कसे काय कोल्हेदादा ? माझ्या स्वयंपाकघरातून येणारा वास कशाचा असावा असं तुला वाटतं ?' त्यावर तो कोल्हा धूर्तपणे म्हणाला, 'महाराजाधिराज, नुसत्या वासावरून तो वास कशाचा आहे हे सांगता येण्याइतकं माझं नाक आधीच तीक्ष्ण नाही त्यातून मला आज पडसं झालेलं असल्यामुळे आपल्या घरातून येणार्या वासासंबंधाने अभिप्राय देण्याचं धाडस मी करत नाही.' तात्पर्य - प्रसंगावधान व समयसूचकता या गुणांच्या बळावर माणुस वाटेल तसल्या संकटातून मुक्त होऊ शकतो. N/A References : N/A Last Updated : January 11, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP