मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा १०१ ते १५०| मांजरे व उंदीर कथा १०१ ते १५० मधमाशा आणि त्यांचा धनी लांडगा आणि बगळा कुत्रा आणि सिंह कोळी आणि चिमणी कोल्हा आणि साळू कोल्हा आणि कावळा कोल्हा आणि करकोचा गरुडपक्षीण आणि कोल्हीण गाढवाचे पोर आणि रानडुक्कर डोमकावळा देवाकडे राजा मागणारे बेडूक बोकड आणि बैल अविचारी शेतकरी शेतकरी आणि दैव उंदीर आणि बेडूक समुद्र किनार्यावरील प्रवासी पारवा आणि तसबीर लांडगा आणि कोकरू लांडगा आणि मेंढी कुत्रा आणि त्याचा मालक कोंबडा आणि रत्न किडा आणि खोकड खेकडा आणि त्याचे पोर कावळा आणि कबुतरे पायाला साखळी बांधलेला कावळा कबुतर आणि कावळा हंस आणि बगळा गिधाड आणि त्याचे पाहुणे गावठी गाढव आणि रानगाढव गरुड आणि घुबड गाढव व कुत्रा गाढव आणि बेडूक धीट कुत्रा धनगर आणि त्याच्या मेंढ्या देव आणि माकड दैव आणि मुलगा दैव आणि गावंढळ मनुष्य चिलट आणि सिंह बगळे आणि राजहंस बाभळ आणि सागवान अस्वल व कोल्हा बैल आणि बोकड बैल आणि चिलट चित्ता आणि कोल्हा दोघे वाटसरू व अस्वल उंदीर, कोंबडा व मांजर तरुण आणि त्याचे मांजर सिंह आणि तीन बैल शेतकरी व गरुड बहिरी ससाणा व कोंबडा ससा आणि कुत्रा सरदार व त्याचा घोडा समुद्र आणि नद्या साळू आणि साप मेंढ्या व कुत्रे माणूस व मुंगूस मांजरे व उंदीर मांजरे व उंदीर इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral. Tags : aesop fablesbalkathaइसापनीतीतात्पर्य कथाबालकथा मांजरे व उंदीर Translation - भाषांतर एकदा मांजरे व उंदीर यांची लढाई फार दिवस चालली होती. त्यात प्रत्येक वेळी उंदराचा पराभव होऊन त्यांना पळून जावे लागले. एकदा सगळे उंदीर जमून पराभवाचे कारण काय याचा विचार करीत असता त्यांना असे समजले की आयत्या वेळी आपला सेनापती कोण आहे हे आपल्या सैन्याला ओळखता येत नसल्याने पराभव होतो. तेव्हा सेनापती कोण आहे हे ओळखता येण्यासाठी त्याने काहीतरी चिन्ह धारण करावे असे ठरले. प्रत्येक सेनापतीने आपल्या डोक्यावर गवताची लहान मोळी बांधावी असे ठरले. त्याप्रमाणे केले गेले. नंतर सगळे सेनापती सैन्यासह लढाईवर गेले. पण मांजरांपुढे उंदराचे काय चालणार ? पराभव होऊन ते सगळे पळत सुटले व जीव वाचविण्यासाठी बिळात शिरले. अशा प्रकारे शिपायांनी स्वतःचा जीव वाचवला पण सेनापतीची स्थिती फार वाईट झाली. त्यांच्या कपाळावर गवत बांधलेले असल्यामुळे त्यांना बिळात शिरता येईना व शेवटी ते सगळे मांजरांच्या भक्ष्यस्थानी पडले. तात्पर्य - मोठेपणाबरोबर माणसाची जबाबदारी व संकटे वाढतात. N/A References : N/A Last Updated : January 11, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP