मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा ३०१ ते ३५०| पोपट आणि पिंजरा कथा ३०१ ते ३५० कोळी व माकड कोल्हा व सिंह कोल्हा आणि बोका किडा आणि त्याचे पोर गाढव व त्याचा मालक बोकड आणि फुलझाड जेवायला गेलेला बोका भिकारी आणि त्याचा कुत्रा बकरे, मेंढे आणि लांडगे आंधळा व लांडग्याचे पोर आजारी सिंह आणि कोल्हा गरुड पक्षीण, मांजर व डुक्करी बोकड आणि बैल शेतकरी आणि कोल्हा जाळ्यात सापडलेला रेशमाचा किडा मुलगा आणि पोपट तरुण पुरुष आणि कोकीळ ससा आणि शिंगे इसाप व कोंबडी सरडा माशा, मधमाशा व गांधिलमाशी लढाऊ कोंबडे व बदके वाघ आणि कुत्रा कोल्हा व कोंबडा मधमाशी आणि कोकिळा गरुड, डोमकावळा आणि घार गरुडाचे सौंदर्य सिंह, गाढव व ससे दोन कोल्हे माणूस व गाढव उंदीर आणि मांजर पोपट आणि पिंजरा कंजूस माणूस व पोपट मेंढीचे कातडे पांघरलेला लांडगा म्हातारा आणि पोपट दोन प्रवासी आणि गाढव नाचणारी माकडे आंधळी मेंढी कुत्रा आणि मांजर कोल्हा आणि लांडगा डौली घुबड अस्वल व कोंबड्या कोंबड्या व पेंढ्या भरलेला कोल्हा गरुड आणि ससा मासे व कोळी मधमाशी व कोळी बेडूक व मधमाशी रोगाची साथ आणि प्राण्यांची सभा एक पोपट व त्याचा पिंजरा भुंगा व चिमणी पोपट आणि पिंजरा इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत. Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral. Tags : aesop fablesbalkathaइसापनीतीतात्पर्य कथाबालकथा पोपट आणि पिंजरा Translation - भाषांतर एका माणसाने एक पोपट पाळला होता. त्याला त्याने एका सुंदर पिंजर्यात ठेवले होते. तो मनुष्य त्या पोपटाच्या खाण्यापिण्याची फार काळजी घेत असे. तसेच घरातली इतर माणसेही त्या पोपटाचे खूप लाड करीत असत. एक स्वातंत्र्य सोडले तर इतर सर्व सुखं त्या पोपटाला अनुकूल होती. पण असे असूनही तो पोपट नेहमी मनात म्हणत असे की, 'देवा ! दुसरे पक्षी रानात कसे स्वच्छंदपणे उडत असतात, ते किती भाग्यवान ! तसं भाग्य माझ्या वाट्याला कधी येणार ?' एक दिवस नोकरांच्या हातून पिंजर्याचे दार चुकून उघडे राहिले. ती संधी साधून तो पोपट बाहेर पडून रानात उडून गेला. बरेच दिवस हवे असलेले स्वातंत्र्य मिळाल्यामुळे रानात आपण फार सुखी होऊ असे त्याला वाटले. पण झाले मात्र उलटेच ! तो बोलत असलेली माणसाची जी भाषा ऐकून लोकांना मोठा आनंद होत असे, तीच भाषा ऐकून इतर पक्षी त्याला विनाकारण टोचून छळू लागले. जे गोड गोड शिजवलेले अन्न खाण्याची त्याला सवय झाली होती ते त्याला मिळेनासे झाले. स्वतः कष्ट करून पोट भरावे तर त्याची त्याला सवय नव्हती. त्यामुळे उपासमारीने तो तडफडू लागला. पावसाने पंख भिजल्याने त्याला थंडीत कुडकुडत बसावे लागू लागले. या सर्व त्रासाने शेवटी तो आजारी पडून मरणोन्मुख झाला. प्राण सोडताना तो म्हणाला, 'हाय रे दैवा ! माझा जुना पिंजरा मला पुन्हा मिळाला असता तर मी तो सोडण्याचा मूर्खपणा कधीही केला नसता. पण आता काय उपयोग ?' तात्पर्य - उशिरा सुचलेले शहाणपण काय कामाचे ? N/A References : N/A Last Updated : January 11, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP